राजगड
राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या कालखंडातील साक्षीदार. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहरच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्याखोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. अभेद्यतेचे दुसरे रूप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटाचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव असा गाद म्हणजे राजगड.
मावळभागांमध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हि दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकणी होती. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकारणे लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय ईंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या आणि एक बालेकिल्ला आहे. तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याची सूचना आहे.
राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची उंची समुद्रसपाटी पासून १३९४ मी आहे. " राजगड त्याची महत्त्वाकांक्षी उंची दाखवतो, तर रायगड शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यावर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीनी स्वर्गावर केलेली स्वारी.
राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. डोंगराला किल्लूचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी, तसेच सतार किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम राजांचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी रायगडावर नेली.
राजगडाचे पूर्वीचे नाव मुरंबदेव... हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखले जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्या असे नव्हते. इ.स. १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वाळेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्यांनी मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनशर्त शरण एलूमुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यासाठी विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थपित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. निजामशाहच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला.
१६३०च्या सुमारास हा किल्ला अदिलशाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुंबदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बालाजी नाईक शिलिमकरांचा नंतर सन्मानही केला.
शिवाजी महाराजांनी तोरणा पाठोपाठ हा किल्ला जिंकून घेतला आणि किल्ल्याचे बांधकाम मोठ्या झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंग किना माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना ' सुवेळा, संजीवनी आणि पद्मवती ' हि नवे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इ.स. १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते कि शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेलीहोती. या फौजेने राजफच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली, परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयन्त केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.
धन्यवाद.....
Comments
Post a Comment