किल्ला क्र. ५ सिंहगड ( Sinhagad )

 सिंहगड  

सिंहगड म्हणजेच कोंढाणा.... सिंहगड हा किल्ला पुण्याच्या नैऋत्याला २५ किमी अंतरावर असणारा समुद्रसपाटीपासुन ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गाद आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राज्यांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होरा. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता. 
सिंहगडचे मुळ नाव कोंढाणा होते. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. पण या लढाईत तानाजींना वीरमरण आले. प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे. 
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गाद परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कोंढाणा आपण घेतो म्हणून तानाजी मालुसरे यांनी काबुल करून वस्त्रे, विडे घेऊन ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान राजपूत होता. त्यास कळले कि गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा  बार घेऊन, हिलाल ( मशाल ), चंद्रज्योती लावून बसवाशे मानून तोफेची व तिरंदाज, बर्चीवाले, चालोन आले.

 तेव्हा मावळे लोंकाची फौजेवर रजपुत चालून गेले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. ५०० रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याची व तानाजी मालुसरा याची गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीच्या डाव्या हाताची ढाल सुटली. दुसरी ढाल समयास अली नाही. मग तानाजीने आपले दवे हाताची ढाल करून त्याच्यावर वोढ घेतली. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा ( तानाजीचा भाऊ) याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारले. किल्ला काबीज केला. 
   
तोफेच्या दारूचे कोठार - दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारक्त दिसते तेच तोफेच्या दारूचे कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन सर्व माणसे मरण पावली. 
टिळक बंगला- रामलाल नंदरं नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्वर-  हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. 
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर- कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले कि डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात संरक्षसाचे मुंडके आहे. 
देवटाके- तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे. व आज्जही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुदाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत. 
कल्याण दरवाजा- गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्री शालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रमांत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान शिलालेख आढळतो.  

उदेभानाचे स्मारक-  दरवाज्याच्या  वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारक म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा होता. झुंजारबुरूज हे सिंहगडाच्या दक्षिण टोक होय. उदेभानच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येत येते. येथून टोपीसारखा  उजवीकडे तोरणा हे गाद दिसतात  पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांवर पुरंदर दिसतो. 
तानाजी कडा- झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कड्याकडे जात येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे येथूनच तानाजी आवळ्यांसह वर चढला. 
 राजराम महाराज स्मारक -  राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी दि २ मार्च १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक-  अमृतेश्वराचे मागच्या बाजूने वर गेल्यावर सवय बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. 'तानाजी स्मारक समितीचे' वतीने हे बांधकाम झाले आहे. माघ नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीच्या येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो. 
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किमी अंतरावर आहे. स्वर्गात बसस्थानकापासून सारसबाग  नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ किमी वर आहे. 
मार्ग 
स्वारगेट-आनंदनगर-वडगाव-खडकवासला-सिंहगड पायथा.


"गड आला पण सिंह गेला"


धन्यवाद.....










Comments