राजगड
सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा याचा समावेश होतो. तसेच बादशाहाच्या भेटीला दिल्लीस जाण्याचा करार केला.
शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगावर राजारामांचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरून १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली.
३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर मराठी औरंजेबाच्या कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठयांचे मराठयांचे अनेक गाद जिंकून केला. किशोरशिंग हाडा या मोगल सरदाराने सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी सचिव याने ' कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इमाने च्यांनीच चालववीत ' असा आदेश दिला होता. पुढे ११ नोव्हेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडॆ चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुगर्म होता. औरंगजेबाने एक महिना आधी काही गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान तिथेच टाकून जावे लागले.
२ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुन तीन गज उंच, त्याच उंचीचे दमदम तयार करून त्यावर तोफ चढविल्या व बुरुन तोफांचा भडीमार करू लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला कानी हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ' नाबिशाहगड ' ठेवले. २९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वारंवार बिघडत असल्याने किल्ल्याने शिबंदीचे पगारही वेळेवर नसत. अशाच परिस्थितीमधे राजगडावरील सेवकांचा पगार एक वर्षभर ठाकले होते - राजवाडे खान १२. यानंतर राजगड भोर संस्थानच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीची सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीची सरनोबत पवार आणि संजीवनी माचीची खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारीसुद्धा होते.
राजगडावर जाण्याचा मार्ग- गडावर जाण्यासाठी चोहीबाजूनीं पाऊलवाट आहेत. वेळवंड , मले, भुतंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फनसी, या मार्गे गडावर जात येते. काही पाऊल वाट वापरात नाहीत. दाटझाडी व अतिशय अवघड चढ-उतारणीमुळे तसेच रस्ता चुकण्याचा शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत. शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर-वाजेघर, पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी- गुंजवणे गावबातून अळू दरवाज्यातून गडावर जात येते. तोरण्याच्या बुधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा-सात तासात गडावर नेतो.
पद्मावती तलाव-प्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण तलाव
आढळतो. तलावाच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कामं केलेली आहे.
रामेश्वर मंदिर- पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच पूर्वाभिमुख रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे.
राजवाडा- रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. थोडे पुढे गेल्यावर अंबरखाना लागेतो. त्याच्या पुढे सादर आहे. सदरेच्या समर दारुकोठार आहे.
पाली दरवाजा- पाली दरवाजा पाली गावातून येतो हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे. यातून हत्तीसुद्धा आंबरीतुन आत येऊ शकतो.हे प्रवेश द्वार ओलांडून पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे.प्रवेशद्वाराचे संरक्षण
चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्टय म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना "फलिका " म्हणतात.
गुंजवणे दरवाजा- गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वाराची मलिक आहे. पहिला दरवाजा अत्यंत सध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजायच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घाट घेतलेल्या व एका कमलकालिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. म्हणजेच हे प्रवेशद्वार शिवपूर्व काली बांधलेले असावे. या प्रवेश द्वारातून आत गेल्यास दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.
पद्मावती माची-
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैकी सर्वात प्रशस्त माची म्हणजे पद्मावती माची. माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात.
पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी, हवालदारांचा दावा, रत्नशाला, सादर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
पद्मावती मंदिर-
सुवेळा माची- मुरंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भभक्कम तटबंदी बांधली. आणि पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीला सुवेळा माची असे नाव दिले. या माचीचे ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेली. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे.
याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाण्याऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे ताक आहेत. येथून सरळ जाणारी वाट माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर जाते व डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात जाते.
संजीवनी माची-
सुवेला माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम केले. हि माची सुद्धा ३ टप्प्यामध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवर आजही घरांचे अवशेष अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिल्या टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थंडी मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुज लागतात. या तिन्ही भूरुहनवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा होत्या.
या माचीवर अनेक पाण्याचे टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. ,माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडीची व्यवस्था केलेली आहे. आळु दरवाजानेसुद्धा येत येते. आळु दरवाजुंपसून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. या बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडी आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमधे काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहे याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे.
राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड,मल्हारगड, रोहिडा, रायरेश्वर, आणि लोहगड दिसतात.
धन्यवाद......
राजगडावर जाण्याचा मार्ग- गडावर जाण्यासाठी चोहीबाजूनीं पाऊलवाट आहेत. वेळवंड , मले, भुतंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फनसी, या मार्गे गडावर जात येते. काही पाऊल वाट वापरात नाहीत. दाटझाडी व अतिशय अवघड चढ-उतारणीमुळे तसेच रस्ता चुकण्याचा शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत. शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर-वाजेघर, पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी- गुंजवणे गावबातून अळू दरवाज्यातून गडावर जात येते. तोरण्याच्या बुधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा-सात तासात गडावर नेतो.
पद्मावती तलाव-प्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण तलाव
आढळतो. तलावाच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कामं केलेली आहे.
रामेश्वर मंदिर- पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच पूर्वाभिमुख रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे.
राजवाडा- रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. थोडे पुढे गेल्यावर अंबरखाना लागेतो. त्याच्या पुढे सादर आहे. सदरेच्या समर दारुकोठार आहे.
पाली दरवाजा- पाली दरवाजा पाली गावातून येतो हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे. यातून हत्तीसुद्धा आंबरीतुन आत येऊ शकतो.हे प्रवेश द्वार ओलांडून पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे.प्रवेशद्वाराचे संरक्षण

गुंजवणे दरवाजा- गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वाराची मलिक आहे. पहिला दरवाजा अत्यंत सध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजायच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घाट घेतलेल्या व एका कमलकालिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. म्हणजेच हे प्रवेशद्वार शिवपूर्व काली बांधलेले असावे. या प्रवेश द्वारातून आत गेल्यास दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.
पद्मावती माची-
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैकी सर्वात प्रशस्त माची म्हणजे पद्मावती माची. माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात.
पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी, हवालदारांचा दावा, रत्नशाला, सादर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
पद्मावती मंदिर-
सुवेळा माची- मुरंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भभक्कम तटबंदी बांधली. आणि पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीला सुवेळा माची असे नाव दिले. या माचीचे ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेली. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे.
याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाण्याऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे ताक आहेत. येथून सरळ जाणारी वाट माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर जाते व डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात जाते.
संजीवनी माची-
सुवेला माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम केले. हि माची सुद्धा ३ टप्प्यामध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवर आजही घरांचे अवशेष अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिल्या टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थंडी मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुज लागतात. या तिन्ही भूरुहनवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा होत्या.
या माचीवर अनेक पाण्याचे टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. ,माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडीची व्यवस्था केलेली आहे. आळु दरवाजानेसुद्धा येत येते. आळु दरवाजुंपसून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. या बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडी आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमधे काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहे याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे.
राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड,मल्हारगड, रोहिडा, रायरेश्वर, आणि लोहगड दिसतात.
धन्यवाद......
Comments
Post a Comment