किल्ला क्र. १ शिवनेरी

 शिवनेरी 

शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्रातील जुन्नर गावाजवळ, पुण्याहून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटेसे मंदिर व जिजाबाई व बाळ शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्यावर आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही  शक राजा नहपानाची राजधानी होती.  सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शंकांचा नाश  केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली . सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली. 
  सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. 
यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वर त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. " शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस  नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरें, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इ.स. १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गाद सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंद केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजिजखान याला फितवून  किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयन्त शिवाजी राजांनी  केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला. मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. 

शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा पारवानगी दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गेकिल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास ;लागतो. सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर " शिवाई देवीचे " मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्क्मासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबारखाना आहे. एक वाट समोरच असणाऱ्या टेकडीवर जाते. या टेकाडावर पडझड झाली आहे. 
मात्र पूर्वी अंबारखाण्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापसून दोन वाट निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या देकाडावर जाते. वाटेत गंगा, जमूना, व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाऊंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलावात फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भातील मायलेकरांचा पुतळा " शिवकुंजा" मध्ये बसविला आहे. शिवकुंजा जवळ कमानी मस्जिद आहे. आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. हि इमारत दुमजली असेउण खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच : बदामी पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकाकडे घेऊन जातो. सुमारे दीड  हजार फूट उंचीच ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड  फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड , नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा
जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
 

धन्यवाद 

Comments