किल्ला क्र. ११ जंजिरा ( Janjira)

 जंजिरा


महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक जलदुर्ग आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाने गाव आहे.  



मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रावर एक बेटावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्लावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोया आहे. 

जंजिऱ्याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बंधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय किल्ल्याच्या तटावर ५७५ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल तोफ आहे. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. 


इतिहास: 
जंजिरा किल्ल्यालाच किल्ले मेहरुब उर्फ किल्ले जंजिरा......  जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा बुऱ्हाण निजामशहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजापुरास आहे. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठे ओंडके रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमुळे कोळी लोक सुरक्षितपणे राहत असे. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. 
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत,असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमरखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. 
राम पाटीलला निजामशहा कडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. इ.स. १५२६ ते १५३२ च्या कारकिर्दीनंतर इ.स. १५३२ मध्ये पिरमखान मरण पावला. त्याच्या जागी बुऱ्हाणखानची नेमणूक केली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. 
 पुढे इ.स. १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनिया मधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स. १६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अजिंक्य राहिला.
जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. जवळच एक शिल्प आहे. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. 

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पदमदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. 
किल्ल्याची अवस्था :
जंजिऱ्याची तटबंदी बुलुंद आहे. त्याला सागराकडे एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. 
किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होतस. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर तो सर्व वस्ती तेथून उठून गेली. 


जंजिऱ्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पदमदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वाचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास तो निश्चित स्मरणीय ठरेल. 
असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्दी मुहंमदखान हा शेवटचा सिद्दी असताना, त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजेच ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. 
गडावरील पाहण्यासाठी ठिकाणे:
राजापुरी गावापासून येणारी होडी जंजिरा किल्ल्याच्या पायथ्याशी थांबते. प्रवेशद्वारावरील पांढऱ्या दगडातील पारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्हीबाजूच्या भिंतीवर विशिष्ट प्रकारचे दगडात कोरलेले शिल्प आढळते. हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते. दोन दरवाजामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणाऱ्या पायर्यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव " कलादबंगडी " आहे. 
पीरपंचायत: किल्लाच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. याला पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत ५पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणात काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. 
घोड्याच्या पागा: पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने ताटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात. 
सुरुलखानाचा वाडा: येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी भक्कम बांधणीची इमारत दिसते. यालाच सुरुलखानचा वाडा असे म्हणतात. अनेक वर्षात या वाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. 
 तलाव: या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शेडष्टकोनी गोड्यापाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मी व्यासाचा आहे. चार कोपऱ्यात व्हर हौद आहेत. 

पश्चिम दरवाजा: गडाच्या पश्चिमेला किंचित ताटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्याच्या स्वतंत्र असे २२ बुरुज आहेत. आजही ते सुस्थित आहेत. सर्व किल्ला पाहण्यास तीन तास पुरतात. 

गडावर जाण्याचा वाटा :
१) अलिबागमार्गे: जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर पुणे मुंबई मार्गे अलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरून रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किनाऱ्यापासून किल्ला गाठण्यास अर्धा तास पुरतो. 
२)पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-मार्गे: अलिबागमार्गे न जात पाली मार्गे मुरुडला जात येते. 
३) दिघीमार्गे:  कोकणातून यावयाचे झाल्यास महाड हुन दुघी गाठावे, दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलबध आहे.

धन्यवाद....!



















Comments